क्रीडा मंत्र्यांनी केली मैदानांची प्रत्यक्ष
पहाणी
खेलो इंडीया”च्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये
-विनोद तावडे
श्री. विनोद तावडे म्हणाले, देशातील
ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी, तसेच येणाऱ्या ऑलंपीक स्पर्धेत भारताच्यावतीने खेळण्यासाठी चांगले खेळाडू
तयार व्हावेत, यासाठी खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर
आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला
आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा.
या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या
सुरक्षिततेची वाढीव जबाबदारी आपल्यावर आहे. संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक
नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
या
स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा
प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच या
स्पर्धेच्या निमित्ताने देशातील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक महाराष्ट्रात येत आहेत,
त्यांच्यासमोर आपल्या राज्याची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी,
यासाठी प्रयत्न करावेत.
बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे
यांनी मैदानांची आणि खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पहाणी केली.
यावेळी त्यांनी काही सूचना संयोजन समितीला केल्या.
0000
No comments:
Post a Comment