विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या तयारीचे नियोजन सादर केले. उप विभागीय अधिका-यांना समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आले असून सर्व शासकीय विभागाकडून करावयाच्या पूर्व तयारी संदर्भात नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, को रेगाव-भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकां शी संपर्क साधून बैठकांच्या माध्यमातून विश्वासनिर्मिती करण्यात आली आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, फीरते शौचालये, एसटी बसेसची उपलब्धता, विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, खाद्यपदार् थांचे दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्नीशमन यंत्रणा आदी बाबत काटेकोर नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment