-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित
ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना
कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य
आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी
कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल
सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी
राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,
शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त
करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी
लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
No comments:
Post a Comment